Monday, July 14, 2008

In Search of God

I read a very good article a few days back. Sharing it with you.

It is often said that there is a great conflict between science and religion. It is true that scientists look doubtfully at scriptural statement that the heavens and the earth were created in a matter of days. From their practical studies of the earth and the heavens, they have proved that creation came into being through a slow evolutionary process, and that the progression of the earth alone, from gases to matter, plants, animal life, and, required millions of years. So there is a great deal of difference between the findings of scientists and a literal interpretation of the spiritual texts. One of the virtues of the true scientist is that he is open-minded. Working from a little data, he experiments until he uncovers verifiable principles of nature and how they work; then he gives to the world the result of his investigations. And he is willing to consider and to research further any new evidence that comes to light. It is the efforts of such scientists that have resulted in the discovery of all the natural laws that have been harnessed for the benefit of world today.
Scientists are often branded as materially minded because of their questioning of unimproved religious beliefs. But God does not condemn them for that. His universal laws operate with impartial justice regardless of man's beliefs. In this sense, God is not a respecter of persons but a respecter of law. He has given us free will, and whether we worship Him or not, if we respect His laws, we shall receive the beneficial results of such regard. A doubting scientist might explain his position in this way. "Even if I don't believe in God, I do try to do what is right. If there is God, He will reward or punish me according to my respect for His laws. And if there is no God, since I am obeying the laws I find to be true, surely I shall receive any benefit there from." So, whether or not they are godless, or making their efforts for material gain, those scientists whose research is uncovering more and more of God's laws are nonetheless working in cooperation with Him to do some good for the world.
Law governs everything in the universe; yet most people have never tried to apply the scientific law of experimentation and research to test religious doctrines. They simply believe, thinking it impossible to investigate and prove scriptural texts. "We have only to believe", they assure themselves and others; and that is to be accepted as all that there is to religion. But the Bible tells us that "faith is the substance of things hoped for, the evidence of things not seen". Faith is different from belief, which is only the first step. If I were to tell you that behind this building there is a huge lion, you would probably say, "We don't see how it could be possible". But if I insisted, "Yes, there is a lion there," you would probably believe me to the extent that you would go out and investigate. Belief was necessary in order to make you look into it - and if you didn't see the lion, you would say that I had told you a story! Similarly, if I want to persuade you to make a spiritual experiment, you would have to believe me before you carry it out. You can believe, at least, until you prove differently.
Faith, however, cannot be contradicted: it is intuitive conviction of the truth, and it cannot be shaken even by contrary evidence. Faith can heal the sick, raise the dead, create a new universe. Science is reasonable, willing to alter its views in the light of new facts. It is sceptical about religion only because it has not experimented in that field; although it is now beginning such research at Harvard. Experimental psychology has greatly advanced and is doing its utmost to understand the inner man.
Scientific knowledge is built upon facts. The medical side is fairly well developed, though the causes and cures of certain ailments are yet to be discovered. But what science does know, it is more or less sure about, because the various factors concerned have been tested: theories have been tried and proven. In religion, it is different. People are given facts or truths and told to believe them. After a little while, when their belief is not fulfilled, doubt creeps in; and then they go from religion to religion trying to find proof. You hear about God in churches and temples; you can read about Him in books; but can experience God only through Self-realization attained by practising definite scientific techniques. In India, religion is based upon such scientific methods. Realization is what India specialized in, and those who want God should learn her methods.
There is a definite way to experience God. And what is the way? It is scientific experimentation with religious truths. And put into practice what you believe! It is possible to put religion into practice, to use it as science that you can prove this by experimenting on yourself. The search for Truth is the most marvelous search in the world. Instead of being merely a matter of attending a Sunday service or performing one's puja, religions must have a practical side. Learn how to build your life around spiritual ideals. Without practical application, religion is of little value. It must create some change in you - in your consciousness and in your behaviour.

Wednesday, July 9, 2008

Why I changed from Kishore to Rafi

Many of you, who know me, would not believe that I was a huge Kishore fan at a time.
At my home there is no legacy for interest in songs though all of us like to listen to radio. There are no fanatics of Hindi Film Music (HFM) around me. We have a tape which came from my uncle when he got another one as a gift. With that he gave some 10-12 cassets which primarily had Rafi songs. If I remember correctly, there were 3 of them of Rafi solos, 1 - Yugulgeete and 3 'Sadabahar Naghme'. Also 2-3 new film albums like Saudagar, Dil, Saajan etc. I was brought up listening to radio (which plays old songs majorly) and these audio cassets. This turned me into a fan of golden oldies, but still I was not a fan of a specific singer.
Then, once again, my uncle gave a casset which he got as a gift on 'Mico filters'. This had 3 Rafi, 3 Lata, 3 Asha and 4 Kishore songs. As I was in 12th, I was not going to college and I used to listen to this casset atleast once in a day. One of the songs was 'Roop Tera Mastana' from Aradhana. This song, the use of voice levels, the intensity appealed me so much that I started liking Kishore Kumar's voice. There was one of my friends, Rahul Bhat, who had many cassets of Kishore songs and live shows. After listening them, I turned into a Kishore fan. I was thinking of buying cassets to make a collection of Kishore songs once my 12th is over.
But we bought a computer after 12th. Primary reason to buy a computer for me was, with computer they were giving around 125 songs of Kishore Kumar (with this came another 125 of Rafi too, but who cared?). I was so happy to get all those songs. I used to listen to them day and night. Once, my friend, Swapnil Shinde, gave me 2 Audio CDs (of Rs. 599 each at that time) with Rafi songs. As my parents liked some of the songs in there, I copied that into the computer. I got around 40 songs which were not there with me.
One day, I was listening to a gem from Kishore 'Tum Bin Jaaon Kahan' from Pyar Ka Mausam. I was so enthralled by the song, that I listened to it 4-5 times at a stretch. Then, suddenly, while browsing, I saw another 'Tum Bin Jaoon Kahan' in Rafi folder. This had come from Swapnil's CD. I thought how can HMV make a mistake of putting a Kishore song in Rafi CD. Just as a curiosity I enqueued that song after Kishore version.
I had my headphones on, and when the song started, I was shivering, I was having goosebumps. I could not believe, this is the same song, but in a really really soft voice and full of emotions at every word. This was something out of the world, a divine feeling. I was thrashed, I was thinking how could a singer, a mere mortal, sing better than Kishore, a song which has almost same lyrics, same tune.
That song changed my life, I started listening to Rafi more and more. I became a Rafi fanatic. In each song, there was a difference in voices, according to on screen hero. When we see the song on-screen, we feel that the hero himself is singing. The versatility , the sound quality is unmatched. And I have not had enough of his songs in last 7 years.
Now I have around 4000 songs of him and do not have time to listen to them. I hope one day, I will be free from everything and I will be embraced by his voice whole day!

Wednesday, June 18, 2008

Wimbledon 2008 : Will The History Repeat Itself?

Do you believe that those who do not learn from history are doomed to repeat it? Or do you believe that all we learn from history is that we learn nothing from history?

If Roger Federer wins the 2008 Wimbledon men’s singles he will claim his sixth consecutive Championship. Five consecutive Wimbledon titles is an improbable achievement. Pete Sampras — the most successful player in Grand Slam history — could only win four in a row.

Only one other player has done it: Bjorn Borg, who won five from 1976 till 1980.

Borg claimed his fifth Wimbledon title by beating John McEnroe. Federer claimed his fifth Wimbledon title by beating Rafael Nadal.

Borg took five sets to beat McEnroe. Federer took five sets to beat Nadal. Borg played right-hand, Federer plays right-handed. Borg was the Ice Man, Federer unflappable.

McEnroe was a leftie, Nadal is a leftie. In 1980 Borg was 24 and McEnroe 21. In 2007 Federer was 25 and Nadal 21.

Heading into Wimbledon 1981 Borg was clearly not at his best. He had been troubled by a shoulder injury earlier in the year and suffered shock losses to Victor Pecci and Rolf Gehring.

Heading into Wimbledon 2008 Federer is clearly not at his best. He revealed in March that he had been diagnosed with glandular fever and suffered shock losses to Mardy Fish and Radek Stepanek.

In 1981, the same phrase was re-appearing, that Borg has to lose eventually. That the juggernaut cannot roll on. That was certainly McEnroe’s line of thought. Anyone who has read an article this year about Federer will recognise the theme.

History will show that Borg could not win that sixth title. The Swede had already endured a gruelling five-set semi-final against Jimmy Connors just to reach the final. Against McEnroe this time round the results were reversed, the American winning the first of his three Wimbledon titles 6-4 6-7 6-7 4-6.

McEnroe said recalling the final: “Borg no longer had the same fire, it was like he needed to be relieved of the pressure. I think it had all got too much for him after five years. It seemed as if it was ok in his mind to lose to me.”

Borg said: “I was not really that disappointed. Of all the Wimbledon finals I have played that’s the one I should have won. John didn’t play well and if I had been a little more focused I could have won in straight sets. But afterwards I wasn’t upset. I didn’t care. That felt strange. All the other players wanted to beat me and people expected so much of me. I had to be motivated everyday of the week.”

That is the crux of this argument. The crucial similarity, or difference, between Borg and Federer that will decide the fate of the latter’s bid for six Championships. How does Federer deal with every player wanting to beat him and with the high expectations?

As Borg said after watching Federer equal his record: “If he continues the way he has been doing and stays away from injuries and still has the motivation, he will be the greatest player ever. I think the motivation is the key thing.”

If there is lack of motivation, we may see another great player retiring at 26, and the history would repeat itself.

Tuesday, May 6, 2008

श्रीगणेशा पु. लं. पासून - सखाराम गटणे

"सर, हे पेढे--" सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली.

"कसले रे?"

"प्राज्ञ परीक्षेत पास झालो."

"छान!" प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. "किती पर्सेंट मार्क मिळाले?"

"अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतीशत तरी मिळावेत."

सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीही
भावना जाग्रूत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यसारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित, कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.सखाराम गटणेच्या चेह~यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला, लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला.

"स्वाक्षरी---" आपली वही पुढे करीत तो म्हणाला.

"छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही." मी उगीचच टाफरलो.

"जशी आपली इच्छा--"

त्याने दोन्ही हात जोडुन मला नम्स्कार केला. अगदी देवाला नमस्कारकरावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो. पण सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग नव्हता.वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखारामगटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले.

"संस्थेला भेट देण्या-या सर्व थोरामोठ्यांच्या हात आम्ही सह्या घेतो. पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा स्योग असा आजच येतोय."

मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबर
चहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव--एखादी केरसूणी ठेवावी तसा राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले.

"कुणाला? सख्याला?" चिटणीस आश्चर्याने म्हणाले.

"मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो--"

"सख्याच तो. अरे ए गटण्या--"इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला.

"काय नाव तुझं बाळ?" मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले.

"सखाराम आप्पाजी गटणे."

"अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.""अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?" ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. "कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं---"

"मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो." स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.

मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती.

"हे वाक्य कोणाचं आहे?"

"आपल्याच एका नाटकातलं!" सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला. संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली.

"हे वाक्य का निवडलंस तू बाळ?"

"हे वाक्य मला आपलं जिवनविषयक सूत्र वाटतं."

"बापरे!" मी मनात म्हणालो. त्या चार-साडेचार फुटी उंचीच्या दिनदुबळ्यादेहातून जीवनविषयक सूत्र वैगेरे श्ब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामच्या चेह-याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळाच्या एका म्हाता-याशा सभासदावर गटण्याच्या
'जीवनविषयक सूत्र' ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितले.

"कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का?"

"आपली छापून आलेली ओळ न ओळ मी वाचली आहे. आपण आणि सानेगुरूजी हे माझे आदर्श लेखक आहात."

"अरेम पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरूजी म्हणालास--"

सेक्रेटरी ह्या मनुष्यविशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. वास्तविक गटण्याने दुस-या एखाद्या लेखकालाही सानेगुरूजींच्या जोडीने बसवले असेल, किंबहुना आणखी एकदोन आडवड्यांत एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि सानेगुरूजी अशीही जोडी होईल. ह्याचे मुख्य कारण गटणे अजून सानेगुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता; पण खिडकी बाहेरची इतर दुश्येही आता त्याला आवडायला लागली होती.

सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या द्रूष्टीने म्हणालो,

"काय शिकतोस?"

"यदां एसेस्सीला बसणार आहे."

"अस्सं!" मी त्याची ती अनेक साहीत्यिकांच्या जिवनविषयक सुत्रांच्या गुडांळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. स्वाक्षरीसाठी भित भित पुढे येणारा सखाराम गटणे हा काही पहीला नमूना नव्हता. अमुक अमुक इसम हा स्वाक्षरी घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. पण स्वाक्ष-या जमवण्या-या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेह-यावर बहुधा एक खट्याळ भाव असतो. वही पुढे सरकवताना चेह-याव्र असतो तो आदरांच्या बिलंदर अभिनय! सराईत स्वाक्षरी करणारांना तो ओळखू येतो. सखाराम गटण्याच्या चेह-यावरची रेषा न रेषा कमालीची करी होती. त्याचे ते लहानसहान डोळे काही खोटा, दडवलेला, लुच्चा व्यक्त करायला केवळ असमर्थ होते.

"आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म अपकृत होईन."

सखाराम गटण्याच्या तोडूंन हे वाक्य ऎकताना त्याच्या तोंडात दातांऎवजी छाप-खान्याचे खिळे बसवले आहेत असे मला वाटते. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या
जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणा-या मारूतीलादेखील इतका करूण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. माझ्या आयूष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो.

'सखाराम गटणे' हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयूष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दस-याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी
आले होते. त्यांतला एकानेही मी लिहीलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधीत आहे. रमी, फालतू गप्पा, जागरणे करण्याची अमर्याद ताकद, असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. साहित्यीक
मंडळीत एकूण माझा राबता कमीच! त्यामुळे एकटादुकटा अस्लो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू श्कतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय, पण प्रकाशदेखील नको वाटतो.

सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले.माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.

"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"

"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला. त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.

"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."

"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"

"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"

मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."

हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती.ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांतीची कार्डे, दिवाळिचे अभीष्टचिंतन, नववर्षाच्या सुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे.
अधूनमधून भेटातही असे.

त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रामाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी, असे त्याचे ते हडकुळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान येऊन दारात उभे राहिले.

"या!" मी त्याला आत बोलावले."

आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?"

"अहो, साधना कसली? आराम करीत पडलो होतो--"

"चिंतन वगैरे चालंल होतं का?"

"छे हो! चिंतनविंतन काही नाही. हं, काय, चहा घेणार?"

"नको. मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहील्यापासून अलिप्त आहे."

ह्या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यीक श्ब्दांची जळमुटे धूऊन काढता येतील का, अशा विचारात मी पडलो.

"अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं?"

"उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरेगुरूजींच्या लेख आहे. 'जीवनोन्नतीचे सहा सोपान!'" 'जीवनोन्नतीचे सहा सोपान; हे शब्द गटण्याच्या वेद्यावाकड्या दातांतून पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले!

"माझं ऎकाल का गटणे--असले लेख नका वाचत जाऊ."

"मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो."

"कसलं मार्गदर्शन?"

"मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्यिमत्वाचा पैलू
पडत नाहीत."

"कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला?"

गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरूजीपैकी कुठल्यातरी गुरूजीच्या पंच्याला मी नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या डोंळ्यात फक्त आसवे जमा व्हायची राहिली होती. मला हे माझ्या उद्गारांचा राग आला होता. पण गटण्याने एक एक वाक्य माझा अतं पाहत होत. ह्या मुलाला आता नीट बिघडवायचा कसा ह्या विचारात मी पडलो.

"हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना?"

"हो-- पूर्वी पीत होतो." एखद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून गटणे म्हणाला.

माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरूजीपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेह-याकडे पाहवत नव्हते. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात त्या वेळी शेळीचा चेहरा कदाचीत तसा होत असेल. बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होते. शेळी झाडाची पाने खाते, हा पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून त्यांची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेह-यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाडला होता. त्यांची यादी दिली. काहीतरी विस पुस्तकांची नावे असावित.

"ही मी वाचली आहेत.!"

"सगळी?" मी ख्रुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो.

"हो! पण पुन्हा एकदा वाचून काढीन."

"छे छे-- पुन्हा कशाला वाचता?" वास्तविक मला त्याला सांगायचे होते की,

"मित्रा, आणखी पाच वर्षे रोजचं वर्तमानपत्रदेखील वाचू नकोस."

'भस्म्या' नावाचा एक रोग असतो म्हणतात. त्यात माणसाला म्हणे 'खाय खाय' सुटते आणि खाल्ले की भस्म, खाल्ले की भस्म, अशी रोग्याची अवस्था होते. गटण्याला असलाच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला.

"ह्यांतली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा." वस्ता, तुजप्रत कल्याण असो'च्या चालीवर मी त्याला सांगितले.

"असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी--"

गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखे झाले. त्या पुस्तकांतल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून घेऊन गटणॆ गेला आणि मी सुटकेचा निःश्र्वास टाकला.

आठ्दहा दिवसांनंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचे ते "आपल्या साधनेत व्यत्यय तर आणित नाही ना मी?" हे वाक्य पुन्हा मला येऊन टोचले. त्याच्याहातात पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. गटण्याने आठदहा दिवसांत ती सत्राअठराशे पाने खाल्ली होती. हा म्हणजे अल्लाउद्दिनच्या दिव्यातल्या राक्षचाच प्रकार झाला होता. 'दिलं पुस्तक की खा-- दिलं पुस्तक की खा--' हे काम कठीण होते.

"'काय, कशी काय वाटली पुस्तकं?" त्याला काहीतरी विचारणे प्राप्त होते. गटणे एक अक्षरही न बोलता उभा होता. मला वाटले माझा प्रश्र्न ऎकला नाही. म्हणून मी पुन्हा त्याला विचारले. गटण्याच्या डोळ्यांत पाणी तरारले होत्ते.
मला कुणी रडायबिडायला लागले की काही सुचेनासेच होते. "काय रे, काय झालं?" एकदम त्याला अरेतुरे करायला लागलो. त्या आपुलकीने गटणे अधिकच मुसमुसायला लागला.

रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता तो विशीच्या पलीकडे गेलेला होता. पण त्याला मी प्रथम पाहिला त्यानंतर त्याच्यात मला काहिच फरक वाटत नव्हता. अर्धी विजार जाऊन पायजमा-कोट आला होता. टोपीचे टोक अगदी तसेच नाकासमोर होते. आणि डोळ्यातंला भावदेखील कायम होता.

"काय झालें गटणे? रडू नकोस---"

"मला क्षमा करा."

"पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला?"

"नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणं मी पुस्तकं वाचून काढली--- हे पहा." एक वही माझ्या हातात देत तो म्हणाला.

"मग--" त्या तशा अवस्थेतदेखील त्याच्या 'अनुज्ञा' हा शब्द ऎकून मौज वाटली. ज्या वयात पाचपंचवीस इरसाल शिव्या तोंडात असाव्यात तिथे 'अनुज्ञा'', "मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असली छापील शब्दांची अडगळ त्याच्या तोंडात आठली होती. मी त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहीलेली वही उघडली.

"त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलं आहे."

गटण्याने प्रत्येक पानावर 'समालोचन' लिहीले होते. "पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय रात्री साडेआठ ते एक वाजून पस्तीस मिनीटे. पृष्ठसंख्या दोनशे बत्तीस पाने." अशा थाटात सुरूवातीचे कॉलम भरले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत अस्ली माहीती होती--आणि मग खाली समालोचन होते. "कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मीती वोलोभनीय आहे. कथा मुंबई, नागपुर व लखनौ ह्या तीन स्थळांत घडते..." असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदर
अक्षरात पंचनामा केला होता. गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो. शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास चालवला आहेस--"

"माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे."

"म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.

शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली.

"मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."

"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती. ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?"

"तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"

गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले.

"आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--"

"अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?"

"माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"

मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता.

"कसलं पर्व?"

"कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.

मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन त्याला विचारले,

"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?"

"नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."

"कुणी सांगितलं तुला?"

"आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"

मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटले,

"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ वाचन दांडगं--आणि रडतोस?"

"काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत."

"कोण वाळिंबे?"

"आमच्या प्राज्ञेचे सर!"

तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती.

"असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?"

"माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."

माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर "कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!

"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?"

"त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते.

"अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही म्हणून सांग!"

"तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही जीवनाच्या समरात..."

पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता.

"...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच."

"अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?"

"मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा पाळीन."

प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना.

"बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?"

"हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."

आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?

"मी एकदा सोडून दहादा लग्नाला तयार आहे--पण मी आपणाशी प्रतारणा करू इच्छीत नाही." मी गटण्याच्या डोळ्यातं काही वेडाबिडाची झाक दिसते की काय ते पाहू लागलो.

"माझ्याशी कसली प्रतारणा?"

"आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेलीस्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिला आहे-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!'"

मी कोटटोपी घालून निमूटपणे त्याच्या वडलांना भेटायला गेलो. एका जुनाट वाड्यापुढे आमचा टांगा थांबला.वाड्यातल्या कुठल्या अंधे-या खोलीत आता मला हा माझा हनुमंत नेतो याची मी वाट पाहू लागलो. इतक्यात डाव्या बाजूच्या जिन्याच्या अंधारातून एक भरभक्कम गृहस्थ उतरला. चांगले भरघोस टक्कल,करवती मिश्या, कानाम्वर घनदाट केस, कपाळाला दुबोती उभे गंध, पोटाचा विस्तार पंच्यात्न डोकावणारा, पांढरे स्वच्छ धोतर नेसलेला. हा पन्नाशीतला धष्टपुष्ट गृहस्थ गटण्याचा बाप आहे हे कळल्यावर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना नमस्कार केला.

गटण्याचा घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचे दुकान हा गटण्यांचा अनेक व्यवसायापैकी एक होता. त्याच्या बापाने, रंगाचा तर सोडाच पण दाढीचा ब्रशदेखील हातात धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी ओसरीवर उभ्या न्हाव्ह्याला आपण आज दाढी करणार नसल्याचे सांगितले, असल्या घनघोर माणसाच्या घरात साहित्याची मुळी कशी उगवली मला कळेना.

"या साहेब!" गटण्याच्या बापाने माझे रुंद आवाजात स्वागत केले.

"सख्या,आज जाऊन चहा सांग."

बिळात उंदीर शिरावा तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर पुण्यात गटण्यांच्या सहा इमारती आहेत ही माहिती मिळाली. गटण्याच्या घरात म्हता-या विधवा आतेखेरीज बाईमाणूस नाही हे समजले. आणि ती म्हातारी सध्या दम्याने हलकी होत चालल्यामुळे घरात बाईमाणूस येणे हे किती आवश्यक आहे ते कळाले. त्या वाघासारख्या चेह-याच्या बापाने सख्याची आई त्याच्या वयाच्या बाराव्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केले नव्हते.

"सावत्र आई म्हणजे काय साहेब मी स्वानुभवानं जाणतो. तुमच्यासारख्या विद्वान माणसाशी खोटं का बोलू? आजवर तीन बाया ठेवल्या!" बोटांतल्या पोवळ्याच्या आंगठीकडे पाहत गटण्याचा बाप म्हणाला," आज आपल्यासारख्यांचा आर्शीवादानं सारं काही आहे." गटण्याच्या बापची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा आर्शीवाद ही जोडी अजब होती. हे म्हणजे नळाच्या आर्शीवादाने पाऊस पडण्यापैकी होते. "काय वाटेल ते करा, पन पोराला लग्नाला उभा करा!" एवढा धिप्पाड माणूस माझ्यापुढे कोकरू झाला होता. "मुलगी नक्षत्रासारखी आहे साहेब! सोनगावकर सराफांच नाव ऎकल असेल आपण--" मी सराफांच फक्त नावच
ऎकतो हे मी गटण्याच्या बापाला सांगण्याचा मोह आवरला. "बुधवारात पाच घंर आहेत--- एकुलती एक मुलगी. चांगली शिकली आहे चारपाच यत्ता. शिवाय कूंडली जुळते आहे आणि सखा काहीतरीच खुळ्यासारखं धरून बसलाय. तुम्हाला वचन
गेलंय म्हणतो."

"छे छे!"

"वर या साहेब--"

मग चारपाच काळोखे जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. माझ्या खोलीत पुस्तकांचे एक कपाट होते; सख्याच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्या होत्या. आणि भिंतीवर सानेगुरूजींच्या शेजारी माझ फोटो होता. त्याच्याखाली थेट माझ्या अक्षरात बोर्ड होता-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!' खाली माझ्या सही- सारखी सही होती.

सख्याच्या लग्नात मी माझे सर्व पुस्तके त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला होता-'साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही!'

माझ्या हाताने 'जीवन' हा शब्द त्यानंतर लिहीला नाही. सख्या जीवनाशी एकनिष्ठ राहू लागल्याचे वर्षभरातच मला कळले. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या वाटीतून नातवाचे पेढे घेऊन आले. काही वर्षापूर्वी सख्याने प्राज्ञेचे पेढे दिले होते; त्याच्या बापाने नातवाचे दिले.

सखाराम गटणे मार्गाला लागला. त्याच्या 'जीवनातला' साहित्याचा बोळा निघाला.पाणी वाहते झाले!